आरोग्यपुणेमहाराष्ट्रविशेषव्यवसायीकसामाजिक

“आरोग्यावर चांगला संवाद होणे काळाची गरज;” प्रो. डॉ. कृती वजीर

साई बिझनेस क्लब दयारे 'स्वास्थ महोत्सव' आरोग्यम् परिसंवादाचे आयोजन

पुणे (प्रतिनिधी): साई बिझनेस क्लब दयारे दोन दिवसीय ‘आरोग्यम’ या स्वास्थ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दोन दिवस आरोग्य सेवा उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन करणारे एकूण ४० हून अधिक स्टॉलचा सहभाग होता. सोबतच आरोग्य क्षेत्रांतील नामवंत तज्ञांचा ‘आरोग्यम’ परिसंवाद देखील ठेवण्यात आला होता. परिसंवादामध्ये कॅन्सर विषयावर डॉ. प्रभातकुमार सिन्हा, होमिओपॅथीवर डॉ. केदार लोनगानी आणि प्रथमोपचार व आपात्कालीन या विषयावर डॉ विजय बडे यांनी आपले विचार व्यक्त केले.

परिसंवादाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. राजन संचेती यांनी अल्टरनेटिव्ह अँड मॉडर्न मेडिसिन या विषयावर, होमिओपॅथी कोच डॉ. शरयू क्षीरसागर, नकारात्मक विचारपसून स्वतःला कसे दूर ठेवावे यावर श्री ब्रिजेश कुमार यांचे व्याख्यान तर हितेश्वरी सोलंकी यांनी नॅचरल हीलिंग या विषयावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या मुख्य आयोजीका आणि साई बिझनेस क्लबच्या संचालिका प्रोफेसर डॉ कृती वजीर यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला तर कार्यक्रमाच्या यशामध्ये साथ देणारे सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

प्रांजळ दळवी हिने गणेश वंदना सादर केली, डॉक्टर नरसिंहा चारोथी यांनी तबलावादन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय कुमार यांनी केले.

प्रो. डॉ. कृती वजीर म्हणल्या, एखादा विषय पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर त्या विषयावर संवाद होणे गरजेचे असते. आज जगात सर्वांना निरोगी आयुष्य पाहिजे आहे. कींतु आपण निरोगी जीवन तेव्हाच जगू शकतो जेव्हा आपण त्यावर चर्चा करून निरोगी आयुष्याचे सूत्र आत्मसात करू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!