देश-विदेशपुणेमहाराष्ट्रराजकीय

गांधी नावाची किंमत पंतप्रधान मोदींना कळणार नाही- ज्येष्ठ नेते उल्हास पवार

सोनियाजींच्या वाढदिवसानिमित्त सतराव्या सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे उद्घाटन

पुणे : “आदरणीय सोनिया गांधी यांचा राजकारणात येण्याचा विचार नव्हता. मात्र, जीवनात आलेले कठीण प्रसंग आणि झालेले आघात या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला, देशाला सावरण्यासाठी मोठ्या धैर्याने त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांचा त्याग, सेवाभाव व कर्तव्यनिष्ठा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल यांनी केले.अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १७ व्या सेवा-त्याग-कर्तव्य सप्ताहाचे उद्घाटन सोनल पटेल यांच्या हस्ते झाले.

बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या समारंभावेळी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, शहराध्यक्ष रमेश बागवे, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दीकी, सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे, प्रदेश काँग्रेस सदस्य संजय बालगुडे, गटनेते आबा बागुल, वीरेंद्र किराड, माजी महापौर रजनी त्रिभुवन, नगरसेवक रवींद्र धंगेकर, दत्ता बहिरट, लता राजगुरू, अविनाश बागवे, सुजाता शेट्टी, सोनाली मारणे, रफिक शेख, विशाल मलके, ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रशेखर कपोते, प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे, चेतन अगरवाल यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

सोनल पटेल म्हणाल्या, “पंतप्रधान पदाची संधी असतानाही त्याचा त्याग करीत डॉ. मनमोहन सिंग यांना पद दिले. या काळात त्यांनी समाजाच्या सर्वच घटना समान न्याय देण्यासाठी मनरेगा, अन्नसुरक्षा, माहिती अधिकार, शिक्षणाचा अधिकार असे महत्वपूर्ण कायदे आणण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. विदेशी बाई अशी टीका सहन करून त्यांनी नेटाने, जिद्दीने देशाची सेवा करत आपले कर्तव्य बजावले.”

झिशान सिद्दीकी म्हणाले, “आदरणीय सोनियाजींच्या वाढदिवसानिमित्ताने होत असलेला सप्ताह युवकांना प्रेरणा देणारा आहे. काँग्रेसने देशाला खूप काही दिले आहे. मात्र, आताचे सरकार काँग्रेसने सत्तर वर्षात काय केले, अशा वल्गना करत आहे. काँग्रेसने, नेहरू-गांधी घराण्याने उभारलेल्या पायाभूत सुविधांचा लाभ आज ते घेत आहेत. काँग्रेसला सोडून ना सरकार बनू शकते ना विरोधी पक्ष, हे सत्य स्वीकारावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या सात वर्षात एकदाही पत्रकारांना सामोरे गेले नाहीत. हेच त्यांचे अपयश आहे.”

रमेश बागवे म्हणाले, “डोळ्यासमोर सासू इंदिरा गांधी, पती राजीव गांधी यांची हत्या झाली. पण खचून न जाता देशाची सेवा करण्यासाठी पुन्हा त्या धैर्याने उभ्या राहिल्या. पंतप्रधान पदाचा त्याग करत काँग्रेस पक्षाची, देशाची सेवा करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या या त्यागाला, सेवेला आपण आगामी निवडणुकीत काँग्रेसला निर्भेळ यश मिळवून देत त्यांना आपण अभिवादन केले पाहिजे.”

मोहन जोशी म्हणाले, “गांधी-नेहरू घराण्याची त्यागाची परंपरा आहे. गांधी कुटुंबाचा सेवाभाव, त्याग आणि कर्तव्यभाव देशाला प्रेरणादायी आहे. या सप्ताहात विविध व्याख्याने, स्पर्धा, उपक्रम, आरोग्य-रक्तदान शिबिर होईल. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव आणि १९७१ च्या युद्धाचा सुवर्णमहोत्सव या दोन गोष्टीना यंदाचा सप्ताह समर्पित केला आहे.”

यशराज पारखी यांनी सूत्रसंचालन केले. आभार दत्ता बहिरट यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!