
Pune: पुण्यातील तळजाई उद्यान टेकडी परिसरात पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. या अनोख्या वटपौर्णिमेचे आयोजन पुण्यातील गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशन आणि प्रेरणा द मोटिवेशन यांच्या वतीने करण्यात आले असून संस्थेचे अध्यक्ष सौ. शारदा विनोद दातीर पाटील यांच्या संकल्पनेतून महिलांनी निसर्गाचे प्रतीक म्हणून वडाच्या झाडाचे पूजन करून तर हातामध्ये रोप घेत झाडाला प्रदक्षिणा मारून वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली. उपस्थित सर्व महिलांनी तळजाईच्या निसर्गरम्य परिसरात आपल्या हाताने रोप लाऊन एक आदर्श वटपौर्णिमा साजरी केली.

पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी करताना उपस्थित सर्वच महिलांनी पारंपारिक वेशभूषा प्रधान केली होती. आजची आधुनिक सावित्री ही वडाच्या झाडाची फांदी तोडून नाही तर एक झाड लावून वटपौर्णिमा साजरी करणार अशी संकल्पना आयोजक शारदाताई यांनी मांडली आणि त्यांना उत्तम प्रतिसाद देखील महिलांनी दिल्याचे पाहायला मिळाले. या स्तुत्य उपक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष सुभाष जगताप, श्री महालक्ष्मी केटरर्स अँड सर्विसेस चे सोनू जोशी, गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशनचे विनोद दातीर, जयंत द्विवेदी यांचे सहकार्य लाभले होते तर सौ. कृत्तिका, नीना ताई, मनिषा, रेखा, स्मिता, शीतल, विशाखा, भावना, पूनम यांच्यासह प्रेरणाच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, आणि पर्यावरण प्रेमी महिलांनी सहभाग घेतला.

शारदा दातीर म्हणाल्या, मानवाचे आयुष्य हे ऑक्सिजन ने चालत त्यामुळे नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी फक्त वडाची पूजा करून भागणार नाही तर ऑक्सिजन देणारे झाडे लावायची आवश्यकता आहे. झाडाची फांदी तोडून नाही तर झाड लाऊन वटपौर्णिमेचा पवित्र सण महिलांनी साजरा करावा असे आवाहन देखील त्यांनी केले.