
पुणे: गेले दोन वर्षे बंद असलेली बाबा बर्फानी अमरनाथ यात्रा यावर्षी भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. दर्शनाची भावना खुप वर्षांची होतीच परंतु बाबा भोलानाथ यांच्या मर्जी आणि आशिर्वादा शिवाय ते शक्य नाही. आणि बाबांच्या कृपेनेच यावर्षी सहपरिवार दर्शन करण्याचा योग आला. मी, माझी पत्नी सौ. दिपाली राठी, दोन मुली, आई-वडील व सासू-सासरे सोबतच मित्र जितेंद्र पांडे, अनूप सोनी व त्यांच्या परिवार तसेच जय महेश मंचाचे काही सदस्य, महिला, पुरूष असे सदोतीस (३७) भाविकांचा समुह यात्रेसाठी तैयार होता. यासाठी शारिरीक, मानसिक तैयारी ही आम्ही चालू केली. १ मे २०२२ पासून व्यायाम, चालण्याचा, पहाडावर चढण्याचा सराव आम्ही करू लागलो. या कालावधीतच नियमानुसार हव्या असलेल्या आरोग्य तपासणी देखील आम्ही करून घेतल्या. पुणे ते श्रीनगर विमान प्रवासाचे टिकीट भाडे आठ ते दहा हजार असतांना ते आम्हाला फक्त चौदाशे(१४००) रुपयात मिळाले, आणि आठ जुलै रोजीचे टिकीट बुक आम्ही केल; यामाघे महादेवाचीच काही कृपा असावी असे मी मानतो. होती
भक्तीची शक्ती जास्त प्रबळ; तरीही यदकदाचीत काही दुर्घटना घडली तर…
– सर्व प्रकारची तैयारी व्यवस्थीत झालीच होती की, ८ जुलै च्या संध्याकाळी पासूनच वृत्तवाहिन्यांवर बातम्या यायला लागल्या की; ढगफुटीमुळे काही भक्तांचा मृत्यू तर काही बेपत्ता झाले आहे त्यामुळे अमरनाथ यात्रा भाविकांसाठी बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून दिले जात आहे. हे सर्व पाहून खरतरं थोड मन काही वेळासाठी चलबिचल झाल होत. सर्व परिवारासोबत बसून याविषयावर चर्चा केली; आणि निर्णय घेतला की आपण यात्रेला जायचे. नंतर सर्व मित्र जे यात्रेसाठी येणार होते त्यांनाही संपर्क साधून चर्चा केली आणि सर्वजण यात्रेसाठी येणार असा सकारात्मक निर्णय झाला आणि आम्ही पुर्ण श्रद्धेने सर्व तैयारीसह बाबा अमरनाथ यात्रेसाठी ८ जुलैला रात्रि विमानाने प्रस्थान झालो. बातम्यांचा नकारात्मक प्रभाव कुटुंबातील अन्य सदस्यांच्या मनात भीती निर्माण करण्यात कारणीभूत असने सहाजिक होत; किंतु भीती पेक्षा भोलानाथावर असलेली भक्तीची शक्ती जास्त प्रबळ होती. तरीही यदकदाचीत काही दुर्घटना घडली आणि आम्ही वापस येऊ नाही शकलो तर घरी असलेल्या मुले व सदस्यांना आपल्याकडे असलेल्या संपत्ती, बॅक बॅलन्स, कर्ज, एफ.डी, पॉलिसीस आदींची सर्व माहिती जाण्यापूर्वीच आम्ही सांगून ठेवली होती.
“वर दर्शनाला जाऊ नये जीवाला धोका उद्भवू शकतो..!” अतिवृष्टीचे साक्षीदार एका भाविकांने दिला सल्ला
– विमान प्रवास करून पहलगाव येथे हॉटेलवर मुक्कामी असतांना विविध ठिकाणाहून असलेले भाविक त्याठिकाणी होते. यात्रा भाविकांसाठी बंद होती. हॉटेल मध्ये एका सदगृहस्थासोबत बोलत होतो ते त्या अतिवृष्टीचे साक्षीदार होते. त्यांनी त्या भयानक वेळेचे दृश्य आमच्या डोळ्यासमोर आणून दिले आणि सल्ला दिला की वर दर्शनाला जाऊ नये जीवाला धोका उद्भवू शकतो. थोडी भीती वाटत होतीच पण त्याहून अधिक बाबा अमरनाथाच्या दर्शनाची भावना तिव्र असल्याने दर्शनासाठी येऊदे अशी प्रार्थनाच महादेवा पुढे आम्ही करत होतो. आणि अखेर दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर १० जुलैला नोटीस आली की उद्या भाविक दर्शनासाठी जाऊ शकतात. आम्ही मन ही मन खुप आनंदी झालो आणि रात्री लवकर आराम करून सकाळी तीन वाजता उठून दर्शनाला जाण्यासाठी सज्ज झालो.
‘भीति वर भक्तीचा विजय’,
जय बाबा बर्फानी, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, जय भोले अशा विविध नामांचा जयघोषात या़त्रेला सुरूवात
– साधारण ३२ km चा रस्ता पार करून बर्फानी अमरनाथ बाबाचे दर्शन करणे इतकेही सरळ आणि सोपे नव्हते. पायी चालत यात्रा करण्याची इच्छा होती किंतु १३ जुलैला वापसीचे टिकीट असल्याने लवकर दर्शन करून माघारी परत येणे देखील महत्त्वाचे होते. त्यामुळे वेळ वाचावा यासाठी आम्ही घोड्यावर यात्रा करण्याचा निर्णय घेतला आणि यात्रा सुरू झाली. चहूकडे भाविकांची गर्दी आणि हर हर महादेव, बाबा अमरनाथ की जय, बम बम भोले आदी जय घोषात आम्ही पुढे पुढे जात होतो. रस्तात जागोजागी असलेली सुरक्षा व्यवस्थेचे करावे तितके कौतुक कमी आहे. भारतीय सैनिक भाविकांचे प्रोत्साहन वाढवून त्यांना काळजीपूर्वक यात्रा करण्यासाठी मार्गदर्शन करायचे त्यांची ही सेवाभाव पाहून मन आदराने भरून येत होते. जर कुणाला काही शारीरिक त्रास जाणवला तर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली असल्याने तुरंत त्याचा लाभ भक्तांना होत असे. आपल्याला हवे असलेले खाद्य देखील लंगर मध्ये असल्यामुळे पोटाला खळ पडण्याची शक्यता कमी होती. लंगर मध्ये सेवा देन्याचा लाभ ही आम्ही घेतला. अशा प्रकारे सर्व अंतर पुर्ण करून अखेर बाबा बर्फानीच्या गुफेचे दर्शन आम्हाला झाले.
“मानसरोवर/कैलास पर्वतावर येऊदे आणि दर्शनचा लाभ आम्हा भक्तांना मिळू दे” !
– गुफेला पाहिल्यावर जी आनंदानुभूती आम्हाला झाली ती शब्दात व्यक्त करण्यासाठी मि सक्षम नहीं. अप्रतिम दृश्य, कितीही पाहत राहिलो तरी डोळे भरत नव्हते. फक्त पाहतच रहावे अशी ते बाबा बर्फानी. अपेक्षेप्रमाणे दर्शन खुप छान झाले परंतु दर्शनाचा मोह काही आवरत नव्हता. बाहेर आल्यावर पुन्हा दर्शनासाठी आत प्रवेश करावा अशी इच्छा होत होती. आम्ही मंदिराच्या आवारात असलेल्या सैनिकांना पुन्हा एकदा आत प्रवेश मिळाला अशी भावना व्यक्त केली. त्यांनीही सहज आम्हाला होकार दिला आणि पुन्हा एकदा दर्शनासाठी आत गेल्यावर बाबा अमरनाथाच्या शिवलिंगाचे दर्शन मोठ्या मनोभावे घेऊन संकल्प आणि देवापुढे प्रार्थना केली की, “जसे तुझे दर्शन सुखरूप झाले तसेच एकदा कैलास मानसरोवर यात्रा ला येऊदे आणि दर्शनचा लाभ आम्हा भक्तांना मिळू दे” !
दर्शन झाल्यानंतर खाली वापस यायचा रस्ता तसा १६ कि. मी. चा लहान होता. परंतु खूप अवघड आणि लहान असल्याने आपन घसरतो की काय असी सारखी भीती वाटत होती. तरी मोठ्या परिश्रमाने आणि भोलानाथ च्या कृपेने तो मार्ग आम्ही पार करून खाली आलो. दोन दिवसापर्यंत ढग फुटी मुळे पुर्णपणे बंद असलेली अमरनाथ यात्रा आम्ही पाण्याचा एक थेंब देखील अंगाला न लागता खडतर, आनंददायी प्रवास करून सहजपणे पुर्ण केली.
भुके को अन्न, प्यासे को पानी! जय भोले बाबा बर्फानी!!
भोले कि फौज, करेगी मौज!!
– सी. ए. धीरज नंदकीशोरजी राठी (अध्यक्ष, जय माहेश्वरी मंच, पुणे)