धानोरी, लोहगाव येथे लखीमपूर शेतकरी हत्येच्या निषेधार्थ बंद

पुणे: महाविकास आघाडीतर्फे आज उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील खिरीया या गावात शेतकरी आंदोलन चालू असताना देशाचे राज्यमंत्री आशिष मिश्रा यांचे पुत्र अजय मिश्रा यांनी त्यांच्या अंगावर जीप चालवून ७ शेतकऱ्यांची निर्घृण हत्या केली याप्रसंगी काही शेतकरी जखमी झाले. याचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडीतर्फे ‘ महाराष्ट्र बंद’ पाळण्यात आला.
धानोरी, लोहगाव, या ठिकाणी शिवसेनेचे आनंद गोयल, अमर धोत्रे, अमोल पवार, राजू मुंढे, दशथ माटवनकर, किशोर टिंगरे, शशी देवकर, संदिप कांबळे, आशिष चवरिया, सचिन खांदवे, तर राष्ट्रवादीचे राजेंद्र खांदवे पाटील, अशोक बापू खांदवे, सहाजी खांदवे, नवनाथ बबन मोझे, अण्णा साठे, मिलिंद खांदवे, चंदू खांदवे, आदि पदाधिकार्यानी सर्व व्यापारी व्यावसायिकांना बंदासाठी विनंती पुर्वक आवाहन केले. आवाहनाला प्रतिसाद देत सर्व व्यापारी वर्गाने आंदोलनास उत्फुर्त साथ दिली.