एस. पी. बिर्याणी आणि निसर्ग सी’फुड मराठी खाद्य उद्योजकांमधील सन्मानिय यशोगाथा
खाद्य व्यवसायिक जवाहर चोरगे व सौ. चंद्रलेखा चोरगे यांच्या घरी देवीची आरास
पुणे: मराठी माणसांनी उद्योजक व्हावे यासाठी हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभर मोहिम चालवली; त्याचे फलित म्हणून महाराष्ट्र फुड इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात उदयास आली. एस. पी. बिर्याणी आणि निसर्ग सी’फुड हे मराठी खाद्य उद्योजक मधला एक सन्मानिय प्रयोग आहे. छोट्या प्रमाणात काम करता करता आज चोरगे यांनी मोठ्या प्रमाणात व्यवसाय उभा केला हे कौतुकास्पद आहे. कोकणातील सौदर्य आणि वैभव त्यांच्या खाद्य संस्कृतीत स्पष्ट दिसते. अशा महाराष्ट्रचे गौरव वाढवण्यार्या चोरगे कुटुंबीयांना शुभेच्छा देत व त्यांच्या देवीचे दर्शन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले.
पुण्यातील प्रसिद्ध खाद्य व्यावसायिक श्री. जवाहर गणपत चोरगे व सौ. चंद्रलेखा जवाहर चोरगे यांच्या येथे गेल्या वीस वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती व कुलस्वामिनी वांगणी गावची मळीई देवींची आरास येथे केली जाते. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज देवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी स्वागतासाठी सौ. चंद्रलेखा जवाहर चोरगे, चिं. हर्षवर्धन जवाहर चोरगे, व सौ. ऋतुजा संदीप साठे उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पुढे जाणाऱ्या व्यक्तीला मागे ओढायचे अशा खेकडा मानसिकतेचे काही लोक असतात त्या गोष्टींच योग्य निराकरण करून पारदर्शक पणे आपली सेवा देण्याचे कर्तव्य जवाहरजी चोरगे करत असतात. कर्तुत्ववान पुरूषांच्या पाठिमागे एक स्त्री असते या उक्तीप्रमाणे निसर्ग आणि एस. पी च्या यशा मागे रेखाताईंचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हणत त्यांनी चोरगे कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.
सौ. चंद्रलेखा चोरगे म्हणाल्या, आमची देवी ही कुमारीका असल्याने नवरात्रीत कुमारिकांना जास्त महत्त्व आम्ही देतो. त्यांची पुजा, पुरणपोळीचा नैवेद्य, वस्त्रदान, बांगड्या भरने आदी कार्यक्रम दरवर्षी आमच्याकडे असतो. डॉ. नीलमताई दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येतात आज त्या उपसभापती पदावर आहेत याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो. पुढे त्या म्हणाल्या, निसर्ग आणि एस. पी. बिर्याणीला आज पंचवीस वर्षे झाले. सुरवाती पासून ते आजतागायत देशभरातील लाखो खाद्य प्रेमींनी आम्हाला साथ दिली. कोणी बदनामीच्या हेतूने काही प्रयत्न जरी केले तरी ग्राहकांचा आमच्यावर असलेल्या विश्वासामुळे त्याचा परिणाम होत नाही. आणि हा ग्राहकांचा विश्वास आम्ही कायम ठेवू असा शब्द सौ. चोरगे यांनी यावेळी दिला.