देश-विदेशमहाराष्ट्रविशेषव्यवसायीक

बजाज ग्रुपच्या वतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी पुणे महानगरपालिकेसमवेत हातमिळवणी

Pune: भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त सरकारच्या वतीने विविध क्रियाकलापांचे आयोजन करण्यात आले आहे. या आनंददायी राष्ट्रीय सणानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानातंर्गत प्रत्येक नागरिकाने त्यांच्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकण्याचे आवाहन सरकारने केले. आपल्या शहरात हे अभियान राबविण्याचा कालावधी 13 ते 15 ऑगस्ट 2022 याप्रमाणे आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ हा कार्यक्रम साजरा करण्याच्या उद्देशाने पुणे महानगर पालिकेला बजाज ग्रुपकडून 5 लाखांहून अधिक राष्ट्रीय झेंड्यांचे वाटप 12 ऑगस्ट 2022 रोजी पुणे महानगर पालिकेत संपन्न झाले. यावेळी सन्माननीय पालिका आयुक्त आणि प्रशासक श्री. विक्रम कुमार; सन्माननीय अतिरिक्त पालिका आयुक्त श्री. रवींद्र बिनवडे; पुणे महानगर पालिकेचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) सचिन इथापे आणि बजाज ग्रुपचे सन्माननीय प्रतिनिधी – बजाज फिनसर्व सीएसआर स्टीअरिंग कमिटी (संचालन समिती) अध्यक्षा शेफाली बजाज; बजाज फिनसर्व सीएसआर आणि ग्राहक अनुभव प्रमुख अजय साठे यांच्या समवेत बजाज ग्रुप ऑफ कंपनीजचे इतर सदस्यही उपस्थित होते.

या निमित्ताने बोलताना बजाज फिनसर्व सीएसआर आणि ग्राहक अनुभव प्रमुख अजय साठे म्हणाले, “हा भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन असून भारतीय असल्याचा अभिमान बाळगत या दिमाखदार पर्वाचा भाग होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात तसेच आत्मनिर्भर भारताच्या क्रांतिकारी प्रवासात सहभागी होण्याची सशक्त परंपरा बजाज ग्रुपला लाभली आहे. हा समूह भारताच्या भावी पिढ्यांना पाठबळ देण्यासाठी कार्यरत असून त्यांच्या सीएसआर कार्यक्रमामार्फत बालक आणि तरुणाईवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.”

पुणे महानगर पालिकेचे पालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, “बजाज ग्रुपकडून 5 लाख राष्ट्रीय ध्वजांचे वाटप करण्यात आल्याने आम्ही त्यांचे आभार मानतो, हे झेंडे पीएमसीच्या सर्व15 वॉर्डात वाटण्यात येणार आहेत. शहराकरिता हे मोठे पाठबळ ठरले असून त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 गौरवशाली वर्षे साजरी करण्यासाठी घरोघरी पोहोचणे शक्य होईल. बजाज ग्रुप ऑफ कंपनीज कायमच अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांत पीएमसीचा बळकट समर्थक राहिला. त्यांनी लसीकरण मोहीम तसेच इतर आरोग्य देखभाल समर्थनात दिलेले पाठबळ खऱ्या अर्थाने लक्षणीय आहे.” भारताचा ‘अमृत महोत्सव’ हा भारत सरकारचा उपक्रम प्रगतीशील भारताची 75 दिमाखदार वर्षे आणि समृद्ध इतिहास, संस्कृती आणि भरीव कामगिरी साजरी करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे.

भारताच्या राष्ट्रध्वज म्हणजे पूर्ण राष्ट्राचे राष्ट्रीय प्रतीक आहे. आपल्या झेंड्याचा मान राखण्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्याकरिता अमृत महोत्सवाचा भाग म्हणून ‘हर घर तिरंगा’ आयोजित करण्यात आला आहे. आपल्या घरात राष्ट्रीय ध्वज उंचावण्यासाठी सर्व भारतीयांसाठी हा कार्यक्रम म्हणजे प्रेरणा आहे.

या उपक्रमाचा उद्देश लोकांच्या मनात राष्ट्रभक्तीचा भाव जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाविषयी आदर वाढविणे हा आहे. पुणे महानगर पालिकेने शहरात 7 लाखांहून अधिक घरांमध्ये राष्ट्रीय ध्वज उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!