दलित पँथर ऑफ इंडिया च्या वतीने जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण
इतिहास विसरायलात तर नवा इतिहास कसा बनवाल; बाप्पूसाहेब भोसले यांचे जयस्तंभाला अभिवादन

पुणे: दरवर्षी आंबेडकरी जनता पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने येतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमा कोरेगाव शौर्यदिन उत्साहात साजरा करण्यात येणार आला. दलित पँथर ऑफ इंडिया च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बाप्पूसाहेब भोसले, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष इलियास भाई शेख यांनी यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण व विजयस्तंभाला अभिवादन करून शूर वीरांना वंदन केले. यावेळी पुणे शहराध्यक्ष शाहरूख पठाण, सागर भालेराव, शशिकांत नाईक, वाजीद सय्यद, शाकिर शेख, जावेद शेख, रहिमान शेख, महबूब मणियार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संयुक्तं राष्ट्र तिबेट मुक्ती चे भारताचे राजदूत, पँथर प्रमूख बाप्पुसाहेब भोसले व दलीत पँथर ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष इलियास भाई शेख यांच्या हस्ते उर्जा मंत्री नितीन राऊत यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. तसेच समाज कल्याण न्याय विभाग पुणे व बार्टीचे अधिकारी यांच्या वतीने बाप्पूसाहेब भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
सदर ठीकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली होती.यंदाचं विजयस्तंभ शौर्य दिनाचं 204 वं वर्ष असल्याने या सोहळ्याला खास महत्त्व आलेलं आहे. विजयस्तंभाला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे गर्दी न होऊ देण्याचे आवाहन देखील जनतेला करण्यात आले आहे.
बाप्पूसाहेब भोसले यांनी वीरांचे स्मरण करण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी आज असंख्य भीम सैनिक कोरेगाव भिमा येथे आले त्याचें स्वागत करून शासन प्रशासनाने केलेल्या उत्तम नियोजना बद्दल तसेच पोलीस व्यवस्थेचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.