महाराष्ट्रराजकीयविशेष

देशाच्या राजकारणात ठाकरे घराण्याचा प्रभाव कायम राहील: शिवसेना उपनेत्या ना. डॉ. नीलम गोऱ्हे

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेने शिवसेनेला तसेच आम्हाला न मागता खूप काही दिले आहे. विरोधकांना उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होतील हे मान्य नव्हते, पण जनता जनार्दनाच्या शक्तीमुळे ते साध्य झाले आहे. देशाच्या राजकारणात ठाकरे घराण्याचा प्रभाव कायम राहील, अशी प्रार्थना देवीचरणी विधानपरिषद उप सभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केली.

शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी श्री तुळजाभवानी मातेचरणी चांदीच्या पादुका अर्पण करण्यात आल्या. यावेळी दर्शनानंतर मंदिर समितीच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे, मंदिर व्यवस्थापक सौ.योगिता कोल्हे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला जे कायदे लागू आहेत ते स्पष्ट होत नाहीत. काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहे. मंदिरात शिवकालीन दागिना किंवा नाणी गायब प्रकरणी बाबतचा चौकशी अहवाल जनतेसमोर यायला हवा. मंदिर समिती सोयीस्कर मंदिर संस्थान या नियमावली बदल करून नवीन पायंडा पडतो याबाबतीत मंदिर समिती, जिल्हाधिकारी,तसेच विभागीय आयुक्त यांच्यासह लोकप्रतिनिधी यांची लवकरच बैठक घेणार आहे. शहरविकास प्राधिकरण असो वा मंदिरात विविध समस्या किंवा विकासात्मक धोरणात बदल यासाठी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

तुळजाभवानी मंदिरात सर्वसामान्य भक्तांना राज्यातील तीर्थक्षेत्राप्रमाणात सुलभ दर्शन व्यवस्था बाबत सूचना देण्यात येतील.भाविकांमध्ये दुजाभाव करू नये. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने नियम सतत बदलू नयेत. तुळजापुर, अक्कलकोट, गाणगापूर, व पंढरपूर बाबत पर्यटन वाढीसाठी काम झाले पाहिजे.याप्रसंगी धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुख आ.कैलास पाटील, महिला जिल्हा प्रमुख शामलताई वडणे, सोलापूर जिल्हा महिला संघटक अस्मिता गायकवाड, माजी उपजिल्हा प्रमुख श्याम पवार, शहर प्रमुख सुधिर कदम, बाळासाहेब शिंदे, प्रा.शंकर लोभे, सुनिल जाधव, विकास भोसले, सागर इंगळे,अर्जून साळुंके, बालाजी पांचाळ अनिल भोफळे, सिद्राम कारभारी,अमोल गवळी, चेतन बेडगर,बापूसाहेब नाईकवाडी, स्वरूप कांबळे, राम मोगरकर, सौदागर जाधव,अमोल घोटकर, नितीन ढेकणे,मीनाताई कांबळे, आदिंसह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या जिल्ह्यातील काही लोकांची दिल्ली पर्यंत पोच असल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अन्याय होत आहे. अद्याप वडिलांच्या हत्या प्रकरणी न्याय मिळत नाही. तसेच लातूरच्या कल्पना गिरी हत्या प्रकरणात त्या कुटुंबाला ही अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही.

राज्यातील शेतकरी बांधवांना तातडीने मदत करावी,स्पर्धा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती दिली पाहिजे. महिला बचत गटांचे प्रश्न असो वा महिला अत्याचाराच्या प्रश्नी तातडीने निर्णय होणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!