भारतातील सर्वात मोठे श्री बालाजी मूर्तीच्या स्थापनेचे भूमिपूजन

मुळशी: अध्यात्म गुरु रघुनाथ येमुल गुरुजी यांच्या संकल्पनेतून आणि योगेशजी भळगर यांच्या पुढाकाराने तीर्थक्षेत्र प्रती गिरणार तसेच भारतातील सर्वात मोठे श्री बालाजी मूर्तीच्या स्थापनेचे भूमिपूजन तीन मे रोजी नानेगाव मुळशी गिरीवन शेजारी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पिरयोगी महंत सोमनाथ बापू (गिरणार), डॉक्टर विजय भटकर, वास्तुविशारद विकास भंडारी, प्रशासकीय अधिकारी वसंत मस्के, विभागीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, प्रताप परदेशी, प्रदीप गारटकर, पोपत ओसवाल, बि. जे. देशमुख, माधव जगताप, कमलाकर ताकवले, यशवंत गायकवाड, मनोज साठे, गोकुळ गायकवाड, राजू कृष्णानी, राजू ओसवाल, दानिश शहा, शेखर यादव आदी उपस्थित होते.
निसर्गरम्य वातावरणात वैदिक ज्ञानाचे पुनरुत्थान व्हावे, पर्यावरण संवर्धन आणि अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालून विज्ञानाच्या धर्तीवर अत्यंत सुंदर गोशाळा उभारली जाणार आहे. त्याच बरोबर विविध संकल्पना राबविण्यात येत आहेत. १२० एकर जागेत निसर्गाच्या सानिध्यात लवकरच याची उभारणी केली जाणार आहे