पालकमंत्री शोधा ५१ रुपये बक्षीस मिळवा जीवन ज्योत फाऊंडेशनने जाहीर केले बक्षीस, गावागावात पोस्टर

नेवासा: मागील पाच दिवसापासुन जिल्हात आवकाळी पाऊस सैताना सारखा पडत आडे. गारपीट आणि वादळी वाऱ्याने रंबी हंगामातील पिके फळबागा उध्वस्त झाल्या आहे. विजपडुन शेतकरी व मुकी जनावरे दगावली आहेत. अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओ़ढावलेली असताना देखील नेते मंडळी मार्केट कमिटीचा गुलाल घेण्यात तर पडलेले नेते खर्चाचा हिशोब करण्यात व्यस्त आहे.
अहमदनगर जिल्हा चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे देखील पद आल्यापासून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे पालकमंत्री शोधणाऱ्याला रोख ५१ रुपयाचे बक्षीस जीवन ज्योत फाऊंडेशनच्या वतीने जाहीर केले आहे.अहमदनगर जिल्हाला आवकाळी पावसाने झोडपुन काढले आहे. तालुक्यात प्रत्येक मंडळात नद्याना पुर आला आहे. विज पडुन गाय म्हैस शेळी मेढी बैल दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. घरातल्या कापसाला कुणी विचारायला तयार नाही. शेतकय्रांचा मृत्यु होत आहे. पाच दिवसा पासुन वादळी वारा, गारपिट, आवकाळी पावसाने रब्बीतील गहु ,ज्वारी, बाजरी, कांदा, उन्हाळी सोयाबीन, फळेभाज्या पालेभाज्या, मोसंबी,टरबूज,पपई व इतर फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र नगर जिल्ह्यात कुठेही प्रशासनाने पंचनामे केलेले नाहीत की येवढे मोठे संकट ओढावलेले असताना देखील खासदार कमीत कमी धिर द्यायला देखील आले नाहीत.
त्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकरी आक्रमक असून पालकमंत्री दिसेल तिथे त्यांचा ‘शेतकरी स्टाइल, ने सत्कार करणार आहेत. त्यामुळे खासदाराना शोधून देणाऱ्यास रोख ५१ रुपये बक्षीस दिले जानार आसल्याचे बॅनर नेवासा तालुक्यात भेंडा, सौंदाळा, नेवासा, कुकाणा, नेवासा फाटा येथे लावन्यात आले आहेत.
या वेळी जीवन ज्योत फाऊंडेशन चे कमलेश नवले,प्रतिक आरगडे,आप्पासाहेब आरगडे, सुशील खरात,तोफिक शेख,सोनी भैय्या,अक्षय बोधक,अभिजाीत बोधक,विजय खरात,नरेंद्र आरगडे,महेश वैताळ,चंद्रकांत आरगडे,ग्रामस्थ उपस्थित होते. हे बक्षीस नगदी स्वरूपात दिले जाणार आहे.