पुणेमहाराष्ट्रविशेषशैक्षणिक

‘जाऊ आनंदाच्या गावी’मध्ये उलगडले ‘स्किझोफ्रेनिया’ग्रस्तांचे अंतरंग

पुणे : मानसिक आजाराविषयी जनसामान्यांमध्ये पुरेशी जागृकता नसते. स्किझोफ्रेनिया सारखा तीव्र मानसिक आजार आटोक्यात येवून ती व्यक्ती सामान्य माणसाच्या प्रमाणे आयुष्य जगू शकते याची माहिती बऱ्याच जणांना नसते. या पार्श्वभूमीवर जागतिक स्किझोफ्रिनिया दिना निमित्त ‘जाऊ आनंदाच्या गावा’ हा स्किझोफ्रिनिया सारख्या तीव्र मानसिक आजाराला समोरे जात आनंदाने जगू पाहणाऱ्या रुग्ण आणि नातेवाकाईकांचा कलाविष्कार पत्रकार भवन हाॅल येथे झाला.

परिवर्तन संस्था संचालित ‘मानसरंग’ आणि किरण गटाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मसापचे कार्यध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी उपस्थित होते. तसेच जेष्ठ नाट्यकर्मी अतुल पेठे आणि परिवर्तन संस्थेचे डॉ हमीद दाभोलकर हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना रेश्मा कचरे यांनी केली. त्यांनी जाऊ आनंदाच्या गावा हे का सूरू केले या विषय थोडक्यात माहिती दिली. डॉ हमीद दाभोलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले ते म्हणाले की स्किझोफ्रेनिया आजाराशी झुंज देणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत करणारी कुठलीही यंत्रणा आपल्याकडे नाही.अशी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न परिवर्तन संस्था मानसरंग गटाच्या माध्यमातून करत आहे कार्यक्रमला स्किझोफ्रेनिया आजाराला.सामोरे जाणाऱ्या मानसमित्रांचे नातेवाईक आणि मानसमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी कार्यक्रमात विविध गाणी नृत्य यांचे सादरीकरण केले सोनाली आणि किरण यानी सूत्रसंचालन केले.

याच कार्यक्रमात ललित देशमुख यांच्या ‘माझिया मना’ काव्यसंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मासापचे कार्याध्यक्ष श्री मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी ते म्हणाले की ललितच्या कवितासंग्राहाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाल्याने माझे हात शुभ झाले, असे मी मानतो. ललितने कवितेतून आपले मन व्यक्त करायला साहित्याची मदत झाली. आणि हेच साहित्याचे मोठे पण आहे. कवितीने नेरेंद्रचा विवेकानंद केला. मानसिक आरोग्य हा समाजाच्या समोरचा एक महत्वाचा प्रश्न म्हणून समोर येत आहे त्याविषयी कलेच्या माध्यमातून केलेल्या अभिव्यक्तिला महाराष्ट्र साहित्य परिषद नक्कीच व्यासपीठ उपलब्ध करून देईल .

कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना अतुल पेठे म्हणाले की तो राजहंस एक ह्या नाटकातील मुख्य पात्र कवी आहे. तो ललित देशमुख यांच्या कवितांच्यामधून नाटककाराला सुचला आहे . कला हा मानसिक आरोग्यावर एक उत्तम उपाय म्हणून समोर आला आहे आणि मानसरंग मुळे हे सिध्द झाले मला या सगळ्या भाग आहे याच्या प्रचंड आनंद आहे.राजू इनामदार ब्रहा नीलकंठ आणि मुक्ता देशपांडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्या साठी प्रयत्न केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!