पुणेमहाराष्ट्रविशेषशैक्षणिकसामाजिक

डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवा निमित्त कर्तुत्ववान व्यक्तीचा गौरव सोहळा

चांगल काम करणाऱ्याला जात धर्म नसतो - डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे: काही नाव सोडली तर सगळ्यात राजकारण्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वाटोळ केलं मात्र कीर्तनकार, कलाकार, साहित्यकांनी ही संस्कृती जपली आहे त्यांचे आभार मानावे लागेल. पूर्वीच राजकारण हे राष्ट्रहिताचे होत मात्र सध्याचे राजकारणी हे स्वार्थ साधण्यासाठी राष्ट्राचा देखील बाजार करायला मागेपुढे बघत नाहीत असे परखड मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

जनहित पत्रकार संघ, महाराष्ट्र व श्री साई एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तुत्ववान व्यक्तीचा गौरव सोहळा आज रविवार, दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पत्रकार भवन येथे संपन्न झाला. ज्येष्ठ साहित्यिक परखड वक्ते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवा निमित्त त्यांचे ७५ दिव्यांनी औक्षण करून, शाल, पुष्पहार, विठ्ठल रुक्माईची प्रतिमा भेट देऊन सह पत्नी विशेष सत्कार करण्यात आला.

सदर सोहळ्याला प्रसंगी कीर्तनकेशरी ह. भ. प. चंद्रकात महाराज वांजळे, प्रसिद्ध गायक, अभंग रचनाकार पंडित यादवराज फड, श्री साई एज्युकेशन ट्रस्टचे सागर शेडगे, दलित पँथरचे यशवंत नडगम, कार्यक्रमाचे आयोजक अमोल पवार, रविराज डेअरीचे रवींद्र सारूक, सोपान वांजळे, दिलीप चोरगे, गिरीश खत्री यांच्या सह विविध मान्यवर, पुरस्कारार्थी, संस्थेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Oplus_131072

यंदाचा पुरस्कार शंकर पिलाजी निवंगुणे (सामाजिक क्षेत्र), भुगाव-भूकंप नागरिक कृती समिती, बाबासाहेब रामचंद्र वाघ (सामाजिक क्षेत्र), सौ. सुरेखा शरद होले (सामाजिक क्षेत्र), प्रा. विजय रामचंद्र मराठे (शैक्षणिक क्षेत्र), मारुती रामभाऊ शिंदे (सामाजिक क्षेत्र), नागेश बाबुराव सोनटक्के (औद्योगिक क्षेत्र), कल्पक फाउंडेशन(डॉ. दीपक पाटील), सौ. कल्याणी संदीप हगवणे, संजय दिनकर कांबळे (शैक्षणिक क्षेत्र), सुनिता नंदकुमार ननावरे (आदर्श शिक्षिका), सर्जेराव दत्तात्रय म्हस्के (सामाजिक क्षेत्र), शुभांगी म्हाळसाकांत निकम (शैक्षणिक क्षेत्र), कुमारी. ईश्वरी दंगेकर (क्रीडा क्षेत्र), कु. रोशन शेट्टी (क्रीडा क्षेत्र), सौ. अंजली सुनील राजवाडे (शैक्षणिक क्षेत्र), सौ. सुनंदा अजित (शैक्षणिक क्षेत्र), पँथर बंडु दशरथ गवळी (सामाजिक क्षेत्र), अँड. आकाश शरद जगताप (सामाजिक क्षेत्र), विश्वास मारुती माघाडे (सामाजिक क्षेत्र) यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्याचे स्वागत अमोल पवार यांनी केले, सूत्रसंचालन दत्ता कडू यांनी तर विजय मराठे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!