गुन्हेगारीपुणेविशेषव्यवसायीक

खोट्या तक्रारदारांवर धर्मेश राजपूत यांचा तब्बल १०१ कोटी २० लाख रूपयांचा दावा

पुणे: धर्मेश राजपूत यांनी बॅटोग्रीन बॅटरीज इंडिया प्रा.लि. कंपनीची व बॅटोग्रीन हायपावर बॅटरी या ब्रँड कंपनीची बदनामी व अब्रुनुकसानी बद्दल खोट्या तक्रारदारांवर कायदेशीर कारवाई करत पुणे न्यायालयात तब्बल एकशेएक कोटी वीसलाख रूपयांचा दावा केला आहे. लवकरच बॅटोग्रीन कंपनीच्या बॅटरीचे उत्पादन चालू करण्यात येईल व उत्तम गुणवत्ता सहीत बॅटरी लवकरच पुन्हा बाजारात येतील असा विश्वास देखील धर्मेश राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

२०१६ साली बॅटोग्रीन बॅटरीज इंडिया प्रा.लि. कंपनीची व बॅटोग्रीन हायपावर बॅटरी या ब्रँड ची काही असामाजिक तत्वांकडून समाज माध्यमातून व वर्तमानपत्रांतून बदनामी करण्यात आली होती. सदर विषयाची कोर्टात याचिका दाखल केली असता बॅटोग्रीन बॅटरीज इंडिया प्रा.लि. कंपनीला न्यायालयाने क्लिन चीट देऊन तक्रारदार व्यक्तींसह प्रमुख सुत्रधार हेमंत कोटीयान यांनी खोटी तक्रार दाखल केली असल्याचा निकाल दिला. अशी माहिती बॅटोग्रीन बॅटरीज इंडिया प्रा.ली. कंपनीचे डायरेक्टर धर्मेश राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या सर्व गोष्टींचा परिणाम हा कंपनीच्या उत्पादन व विक्री वर तसेच उत्पादनास लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर मोठा प्रमाणात झाला व कंपनीचे अतोनात नुकसान झाले. तरीही या परिस्थितीत न डगमगता खोट्या तक्रारदार लोकांच्या विरोधात कायदेशीर लढा दिला व २०२० साली यश मिळाले. पुणे ग्राहकमंच न्यायालयाने न्याय करत धर्मेश राजपूत यांच्या बाजूने केसचा निकाल दिला. तसेच न्यायालयाने निकालात पानं १७ वर स्पष्ट शब्दांत नमूद केले की, सदर हेमंत कोटीयान यांनी तक्रारदार १ व ११ यांच्यासह प्रस्तुत खोटी तक्रार दाखल केली आहे.

यावेळी श्री धर्मेश राजपूत यांनी सर्वच वर्गातील व्यापारी बंधूंना आवाहन करतांना म्हणाले, अशी परिस्थिती कुणावरही येऊ नये. जर आलीच तर न घाबरता त्याचा लढा दिला पाहिजे. जर कुणाला अशा परिस्थितीला समोर जावे लागले तर माझ्याकडून कधीही सल्ला घ्या मी नक्कीच मदत करेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!