महात्मा गांधींचे पणतू व अहिंसेच्या तत्वज्ञानाचे उपासक श्री. तुषारजी गांधी, मुंबई यांना सकल जैन संघ, पुणे तर्फेजिन महावीर ज्ञान-विज्ञान पुरस्कार जाहिर

Pune- जैन तत्वज्ञानाचे प्रवर्तक आणि पुरोगामी विचाराचे समर्थन करणारे पूज्य भगवान महावीर यांनी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य व अनेकांतवाद अशा परिपूर्ण तत्वज्ञानाने समाजाला व जगाला मार्गदर्शन केलेले आहे. २१ व्या शतकामध्ये संपूर्ण जगात मानवाचा मानवाशी संपर्क हा अतिशय वेगळया पध्दतीचा होऊ घातलेला आहे, अशा वेळी पूज्य भगवान महावीर यांचे तत्वज्ञान समाजाला मार्गर्शक ठरत आहे.
महावीरांच्या तत्वज्ञानानेच श्रीमत राजचंद्र यांच्या माध्यमातून महात्मा गांधी यांनी जैन तत्वज्ञान समजावुन घेतले, त्याचा अंगीकार केला आणि भारत देशाला स्वतंत्र्य मिळविले हा भारत हा एकमेव देश आहे. महात्मा गांधीजींचे पणतू व अहिंसेच्या तत्वज्ञानाचे उपासक श्री. तुषार अरुण गांधी यांनी गेल्या ४० वर्षात संपूर्ण जगात नव्याने गांधी तत्वज्ञान प्रसार व प्रचार केला. त्यांच्या कार्याचा सन्मान “जिन महावीर ज्ञान-विज्ञान पुरस्कार” देवून करण्यात येत आहे.
सकल जैन संघ पुणे च्या वतीने या वर्षीपासून “जिन महावीर ज्ञान-विज्ञान पुरस्कार” देण्याचे ठरविले आहे. पुरस्काराचे स्वरुप रु. ५१,०००/- (अक्षरी रुपये एक्कावन्न हजार फक्त), मानचिन्ह, शाल, श्रीफळ, असे राहील. दरवर्षी समाजातील भगवान महावीरांच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करणा-या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येईल.
भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा पुरस्कार देण्यात येईल. जैन धर्माचे गाढे अभ्यासक स्व. सुखलालजी फौजमलजी खाबिया यांच्या स्मरणार्थ खाबिया परीवार, शिरुर यांच्या वतीने हा पुरस्कार रु. ५१,०००/-, मानचिन्ह, शाल, श्रीफळ, देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संत साहित्याचे अभ्यासक आणि जैन तत्वज्ञान व इतिहासाचे गाढे अभ्यासक श्री. सदानंद मोरे यांनी स्वीकारले आहे व सदर पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते श्री. तुषारजी गांधी यांना प्रदान करण्यात येईल. कार्यक्रम रविवार,दिनांक ९ एप्रिल २०२३ , सकाळी ११.०० वा पुणे येथे आयोजित केला आहे.