आरोग्यपुणेमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक

दौंड तालुक्यातील महानंद दूध भुकटी प्रकल्प तात्काळ बंद करा

वरवंड ग्रामस्थांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे उपोषण

पुणे: दौंड तालुक्यातील मौजे वरवंड येथे असणाऱ्या महानंद दूध भुकटी प्रकल्पामुळे परिसरात प्रदूषण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी वाकडेवाडी येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे संग्राम दिवेकर आणि वरवंड ग्रामस्थांनी आत्मकेश लाक्षणिक उपोषण केले. गेल्या वर्षभरापासून या महानंद दूध भुकटी प्रकल्पाविरोधात तक्रार अर्ज दाखल केले आहेत, परंतु कोणतीच दखल घेत नसल्यामुळे अखेर ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ येथे आत्मकेश लाक्षणिक उपोषण केले.

या प्रकल्पामुळे परिसरात तीव्र स्वरूपाचे वायू आणि पाणी प्रदूषण होत आहे. लोकवस्तीला लागून असणाऱ्या कोल फायर बॉयलर व कोल स्टॉकयार्डमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर राखेचा थर जमा होत असुन सदर राखेमुळे परिसरातील हवा, पाणी, जमीन व शेती मोठ्या प्रमाणावर प्रदुषित होत आहे. परिणामी, रहिवाशांना श्वसनाचे आजार, त्वचेचे आजार, पचनसंस्थेचे आजार इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः लहान मुले व बुद्ध नागरिक यांचं दैनंदिन जीवन असह्य झालं आहे.

सदर प्रकल्पाची इटीपी यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित नसल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. सदर बॉयलरमधुन विषारी वायुचे निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा अतिप्रमाणात उत्सर्जन होत असल्याने येणाऱ्या काळात परिसरातील नागरिकांना गंभीर आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. सदर प्रकल्प मधुन निघणारे वेस्ट पाणी हे अप्रत्यक्षपणे परिसरात सोडण्यात येत असल्यामुळे शेतीवर दुरगामी परिणाम होणार आहेत.

संग्राम दिवेकर म्हणाले, सदर महानंद दुध भुकटी प्रकल्पावर ठोस कायदेशीर कारवाई व्हावी. सदर दुध भुकटी प्रकल्प हा रेड कॅटेगरीमध्ये येत असुन लोकवस्तीला लागून असणाऱ्या या प्रकल्पासाठी परवानग्या कुठल्या आधारावर देण्यात आल्या, याची राज्यस्तरीय चौकशी व्हावी, कोळशावर आधारित चालणारा हा प्रकल्प तातडीने बंद करण्यात यावा. जोपर्यंत पर्यायी पर्यावरण पूरक इंधनाचा वापर होत नाही, तोपर्यंत सदर प्रकल्प बंद ठेवण्यात यावा. सदर प्रकल्पाकडुन सक्षम व ठोस यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. जोपर्यंतवरील मागण्यांबाबत सदर प्रकल्पाकडून ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत सदर प्रकल्प बंद ठेवण्यात यावा.

संबंधित प्रदुषण मंडळ अधिकारी हे कर्तव्यात कसुर करत असुन त्यांच्या या बेजबाबदारपणामुळे अप्रत्यक्ष पणे नागरिकांच्या जीविताला हानी पोहोचत असून सदर प्रदुषण अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावे व संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी. प्रदूषण मंडळ हे भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. सदर महानंद डेअरी ची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.अशी मागणी संग्राम दिवेकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!