विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये गरजू मुला-मुलींकरिता सहा जूनपासून प्रवेश सुरु
समितीमुळे ग्रामीण विद्यार्थिनींचे शिक्षण सुकर

पुणे: विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वसतिगृहात मुलींसाठी निवासाची व्यवस्था वाढवल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना पुण्यात उच्च शिक्षण घेणे सोपे होणार आहे. यंदाच्या वर्षासाठी समितीचे प्रवेश सुरू झाले आहेत. ग्रामीण भागातील गरजू, होतकरू आणि अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी-विद्यार्थिनी ज्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्यात प्रवेश घेतला आहे, अशाच विद्यार्थिनींनी या टप्प्यात अर्ज करावेत, असे समिती व्यवस्थापनाने कळविले आहे.
पुण्यात समितीच्या दोन नवीनवसतिगृहांची उभारणी झाल्याने ३३६ मुलींची व्यवस्था वाढली आहे. अल्पदरात निवास आणिभोजनाच्या सुविधेबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी समितीत विविधउपक्रम राबविले जातात. केवळ समाजाच्या मदतीवर गेली ७० वर्षे हे काम सुरू आहे. समितीचीपुण्यात मध्यवर्ती ठिकाणी सध्या सात वसतिगृहे असून १२०० हून अधिक मुला-मुलींची व्यवस्थाआहे. यातील चार वसतिगृहे मुलींसाठी असून तेथे ७०० हून अधिक विद्यार्थिनींची सोयआहे.
शेतकरी, शेतमजूर कुटुंबांतूनही मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, यासाठी अलीकडेप्रोत्साहन मिळत आहे. सुरक्षितता आणि परवडणाऱ्या दरात निवास, भोजनाची व्यवस्थाअसल्याने समितीत प्रवेशाकडे विद्यार्थिनींचा ओढा असतो. समितीची प्रवेश प्रक्रियायेत्या ६ जूनपासून सुरू होणार असून पुणे व अहिल्यानगर येथे उच्च शिक्षणासाठीप्रवेश घेतलेल्या ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे समिती व्यवस्थापनाने कळविले आहे.
प्रवेश अर्ज समितीच्या वेबसाइटवर (www.samiti.org) ऑनलाइन उपलब्ध असणार आहेत.