पुणेमहाराष्ट्र
कळस विश्रांतवाडी येथे लखीमपूर शेतकरी हत्येच्या निषेधार्थ बंद

पुणे: महाविकास आघाडीतर्फे आज उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील खिरीया या गावात शेतकरी आंदोलन चालू असताना देशाचे राज्यमंत्री आशिष मिश्रा यांचे पुत्र अजय मिश्रा यांनी त्यांच्या अंगावर जीप चालवून ७ शेतकऱ्यांची निर्घृण हत्या केली याप्रसंगी काही शेतकरी जखमी झाले. याचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडीतर्फे ‘ महाराष्ट्र बंद’ पाळण्यात आला.
कळस, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, प्रतिकनगर याठिकाणी नगरसेवक सतिस हस्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या सोबत सागर माळकर, विनोद पवार, दिनेश म्हस्के, शशी देवकर, राकेश म्हस्के, योगेंद्र देवकर, रवींद्र देवकर, बालन साळवी, अमर धोत्रे, दशरथ माटवणकर, दशरथ विटकर, उपस्थित होते. व्यापारी वर्गाने या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.