
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे नुकतेच संपन्न झाले. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय शरद पवार हे होते. साहित्यिकांना आणि साहित्यप्रेमींना भेटून त्यांनी संमेलनात सुरु असलेल्या घडामोडी जाणून घेतल्या.यावेळी त्यांनी अंघोळीची गोळीचे संस्थापक माधव पाटील आणि सहकाऱ्यांसोबत संवाद साधत अंघोळीची गोळी आणि हवामानठोसा काय आहे हे समजून घेतले. यावेळी त्यांनी हवामानठोसा या मराठमोळ्या शब्दाचे अनावरण केले.
यावेळी हवामानठोसा म्हणजे आपली पृथ्वी वाचवण्यासाठी उचललेले पाऊल आहे असे माधव पाटील यांनी सांगितले. पृथ्वीला हवामान बदल (Climate Change) हा आजार झालाय. त्यावर उपाय म्हणजे हवामानठोसा.हवामानठोसा म्हणजे पृथ्वीवरील विविध नैसर्गिक स्त्रोत येणाऱ्या पुढील पिढीसाठी जपून वापरणे होय.

शाश्वत विकासामध्ये आपण मनुष्याच्या विकासासाठी निसर्गाचा अशा प्रकारे वापर केला पाहिजे की पर्यावरणाची हानी कमीत कमी झाली पाहिजे. त्यासाठीच महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेने हवामानठोसा द्यायला हवा. हवामानठोसा म्हणजे आपली पृथ्वी वाचवण्याची पंचसुत्री आहे.
ठोसा देणे म्हणजे आपल्या पृथ्वीसाठी किमान पाच गोष्टी करणे होय.१)नको असलेले दिवे,फॅन बंद करणे.२)पाणी बचत करणे.३) झाडे लावणे,ती जगवणे,झाडांना खिळेमुक्तझाडं करून सन्मान देणे.४) स्वच्छ हवेसाठी जागरूक असणे.५) शासन आणि प्रशासन यांना पर्यावरण संवर्धणासाठी वेळोवेळी कारवाई करण्यास भाग पाडणे.या आणि इतर गोष्टी करणे म्हणजेच हवामानठोसा देणे होय.
हवामानठोसा हा मराठमोळा शब्द महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे अंघोळीचे गोळीचे सेक्रेटरी शरद बोदगे म्हणाले.यावेळी आंघोळीची गोळी टीमचे विकास उगले आणि कुमार कटके उपस्थित होते.